About Me

Hello friends, First of all thanks for visiting my blog. I am passionate for Shivaji Maharaj, & I m sharing a little knowledge with you. So kindly, help me if i m wrong anywhere. Thanks

Thursday, July 29, 2010

भविष्यवाणी

बालाची पाचवी झाली, अणि सरवेजन सदरे मध्ये जमा झाले. प्रत्येक जन वाट पाहत होता ती शास्त्रिबुवा न ची . शास्त्रिबुवा सुद्धा आले. आशीर्वाद पुट्पुतात शास्त्रिबुवा आसनस्थ झाले. बालंत घरा च्या दाराशी सारे जन आतुरतेने बालाचे भाकित ऐकायला जमा झाले होते .

श्री गणेशाय नमः शुभम भवतु ....

शास्त्रिबुवान नि पंचांग उघडला , त्यांची बोटे गणित मांडू लागली... कुंडली ची घरे ग्रहा नि भरु लागली. कुंडली मांडून झाली आणि शास्त्रिबुवा न च्या कपालाच्या अथ्या वर वर चढू लागल्या. त्यानी वर पाहून सगल्या न वरून नजर फिरवली अणि शेवट जिजाबाई न कड़े पाहू लागले...

जिजाबाई म्हणल्या...
शाश्त्रिबुवा कोणतीही खंत मन मध्ये ठेवू नका, या पोराच्या वेळी दिवस गेले आणि सगळ्या घरा दाराचा थारा उडाला, कोणाचा कोणामध्ये मेळ राहिला नाही, रक्ता ची नाती वैराची झाली, जहागिरिवर नांगर फिरला, अजोबाचा छात्र गमावल, सगल्या मुलुखाची अवदसा झाली, आमच्या आया बहिनी पलवुन नेल्या गेल्या, अणि मी ही अशी... न सासरी न माहेरी, अश्या या परमुलुखत याला जन्म दिला. पोटा मध्ये असताना ही तरहा, अता याचा जन्माने अजुन काय पदरात येणार आहे तेवढा सांगुन टाका ... आजपर्यंत या जीजा ने खुप सोसलय, परमेश्वरा ने काही सुद्धा ऐकायची शक्ति अजुन माझा मध्ये ठेवली आहे... सांगा शास्त्रिबुवा सांगा....

जिजाबाई इतका सगळ बोलुन सुद्धा शास्त्रिबुवा न च्या चेहरया वरची रेघ सुद्धा हलली नाही. ते अजुन सुद्धा त्याच शांतते मध्ये पाहत होते. " राणिसहेब असल अभद्र मनामध्ये आनु नका, दुर्भाग्य संपला अत , भाग्य उजाडला आहे..प्रत्यक्षा सूर्य पोटी जन्माला आला आहे आपल्या...

हुम्ह्ह , जिजाबाई खिन्न मनाने हसल्या , " प्रत्येक शास्त्री हेच म्हणतो नव जन्मासाठी"

आता मात्र शास्त्रिबुवा उभे राहिले, अन त्याच खन्खानित आवाजात बोलू लागले. सगला वाडा त्यांच्ये शब्द मना मध्ये साठवत होता " राणिसहेब, अविश्वास धरु नका. आजवर या शास्त्र्या चे भाकित खोट ठरल नाही, द्रव्य लोभाने नाही , तर अनुभवाने सांगतो आहे... हे मूल जन्म्जन्मंतरी पांग फेडिल, पापा चा घड़ा भरला आता, एक विसरु नका , धरित्री वरचा दानवा चा तांडव वाढला असता, पाप वाढले तेव्हा भगवान श्रीकृष्णा ने देवकी-वासुदेव च्या पोटी जन्म घेतला होता, अणि तोही कंसा च्या बंदी शाले मध्ये. वनवास रामाला सुद्धा चुकला नाही, म्हणून रावण अंत व्हायचा थांबला होता का ? ? ? नाही ना... लक्षात असुदया राणिसहेब , प्रत्यक्ष भगवान् शंकरा चा तीसरा डोळ्या मध्ये जी अचाट शक्ति आहे, तीच या शहापुत्रा मध्ये पहायला मिळेल... "

सर्व जन थकक झाले होते, कोणाला काय बोलाव सुचत नव्हते . बाल शिवाजी मात्र मुठी चोखत आई च्या कुशी मध्ये शांत पणे झोपी गेला होता........

END OF THE TOPIC



Monday, July 26, 2010

आज दिवस सोन्याचा उजाडला, शिवरायाचा जन्म जाहला ....

लखुजी जाधव च्या बातमीने जिजाबाई पुरत्या खचून गेल्या होत्या, रात्रि अपरात्री त्याना जाग येत असे. सार अंग घामाने दबदबुन निघत असे. शिवनेरी समोर च्या लेन्याद्री ला सुद्धा कापरा सुटायला लागला होता . एक दिवस अचानक जिजाबाई च्या समोर क्ष्मी बाई येउन उभ्या राहिल्या अणि त्यानी त्यांचा मायेच्या रागाने चांगलच बोलून दाखवल ... " की हे चालावालय काय राणिसहेब , जे झाला त्याच आम्हाला वाईट का वाटत नाही, सर्वाना वाटते... आपल काय, निदान त्या पोटा मधल्या पोराची तरी कालजी करा... या सगल्या त्रासाचा परिणाम त्या पोरावर झाल्या खेरीज राहिल का... ? "

जिजाबाई भानावर आल्या... लक्ष्मीबाई जे बोलल्या ते सगला खरा होता. आता त्यांच्या वागण्यात पुन्हा सर्वाना बदल जाणवू लागला होता. जिजाबाई पुन्हा वाड्या मध्ये वावरू लागल्या. सह्याद्रीचा सूर्य आता वाट पाहत होता या विश्वात येण्याची... नऊ महीने संपले होते. विश्वास रावा नि गडावर ब्रह्मण अनुष्ठानाला बसवले होते. निष्णात सुइनी , वैद्य , गडावर सेवेला हजर होते.

दो प्रहरचा सूर्य कलला होता. गार वारा गडावर सुटला होता. वैद्यराज , विश्वासराव , गोमाजी नाइक , अणि मंडली सदरे मध्ये पान जमावित बसली होती, तितक्यात दासी आली.... " रानिसहेबांच्या पोटात दुखायला लागलय"

सर्व जन अदबीने उठून तिकडे निघाले, पण थोडाच वेळात लक्षात आल की तिकडे जाउन काही उपयोग व्हायचा नाही. प्रहर मुंगीच्या पवालानी पुढे सरकत होता, सायंकाल झाली तरी काही बातमी नाही, विश्वास राव, वैद्य सर्व जन विचार करत बसले होते... तेवढ्यात दासी धावत आली , तिच्या चेहरा सांगत होता तिला किती आनंद झालय ते.... "धनि , धाकल मालक आल्याती ... " विश्वास राव आनंद लपवू शकत नव्हते. त्यानी अंगावरचा कंठ तसाच दासी च्या अंगावर भिरकावला. शास्त्रिबुआ पुत्रजन्माच्या घटाका मोजण्यात गुंतले।

सह्याद्रीचा सूर्य जन्माला आला होता.. दृष्टांचा कर्दनकाल जन्माला आला होता.. गरिबांचा कैवारी जन्माला आला होता.... वैशाख शुद्ध , अक्षय तृतीय , शके १५४९ म्हणजेच एप्रिल , १६२७ साली रात्रप्रहरी छत्रपति शिवाजी महाराजांचा जन्म जाहला...

END OF THE TOPIC

Note : Picture displayed in the post is the birth place of Shivaji maharaj on fort Shivneri , on which small Shiv Mandir Stands.